चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी, चित्रा नक्षत्र, वसंत ऋतु या शुभदिवशी श्री शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला. तेव्हापासून दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला खंडोबाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरी नगरीत मोठी यात्रा भरते. विशेषत: या यात्रेस बहुजन बांधव व शेतकरी मोठ्या संख्येने येतात. येणाऱ्या भाविकांकडून कुलधर्म-कुलाचार केला जातो.